MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय


 तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय - जयंत पाटील यांचा आरोप

सोलापूर : महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या अडचणीत आणले तरी भविष्यात हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी दौरा करून टेंभुर्णी (ता. माढा ) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कणाहीन निवडणूक आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्वादी काँग्रेस पक्ष आहे. देशातील विविध 28 राज्यांत हा पक्ष विखुरला आहे. त्यापैकी 23 राज्यांतील पक्ष प्रमुखांनी शरद पवार यांच्याच नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. परंतु ही वस्तुस्थिती असताना निवडणूक आयोगाने केवळ महाराष्ट्र विधिमंडळातील बहुसंख्य सदस्य एका बाजूने गेले म्हणून हा चुकीचा निर्णय दिला आहे,असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

माढा मतदारसंघात शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम करणार्‍या महिलांना धमक्या दिल्या जातात. परंतु कोणी कितीही त्रास दिला तरी उज्ज्वल भविष्यकाळ आमचाच आहे. पक्ष आणि चिन्ह पळविले गेले. परंतु शरद पवार यांच्यावर असलेले सामान्य माणसाचे प्रेम कोणीही हिरावून नेणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. माढा भागासह सोलापूर जिल्ह्यात अभिजित पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही शरद पवारांची साथ सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. बंद पडलेला साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला आणि उत्तमप्रकारे चालवून दाखविला आहे.  एवढेच नव्हे तर शेतक-यांच्या उसाला  चांगला भाव देऊन माढा भागात ऊस  दराची स्पर्धा लावली आहे. परंतु अभिजित पाटील यांच्यावर केवळ राजकीय दबावातून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र शिखर बँकेकडून जाणीवपूर्वक कारवाई करून त्यांना त्रास दिला जात असला तरी न्यायालयीन लढाईत ते यशस्वी होतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी