पोस्ट्स

सांगली स्थानीक विशेष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल. सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा

मिरज पॅटर्न सक्रीय

इमेज
 उदय रावळ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आता आपल्या प्रभागातील विकास कामांना गती देत आहेत. गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा समोर ठेवण्यासाठी जनतेसमोर जावं लागणार आहे. त्यामुळे कामे लवकर संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु आत्तापासूनच गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. म्हणजेच मिरज पॅटर्न सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. महापालिका नगरसेवकांची मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे. तसतसे नगरसेवक आता अनेकांच्या चौकटीसमोर उभे दिसत आहे. भाऊ, काका, दादा, साहेब, मावशी, काकू, तात्या असा उपाद्या देवून गोंजरण्याचे नाटक आता सुरू झाले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय नाट्याचा प्रयोग पाहत अनेक  विद्यमान नगरसेवकांनी लॉगींग सुरू केली आहे. मिरज पॅटर्न प्रमाणे दादा, भाऊ, साहेब गट तयार होत आहे. मिरजेत झालेल्या लक्ष्मी मार्केटमधील आयलॅड उद्घाटनावेळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, कॉंग्रेसचे विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्ती राज्य अध्यक्ष समित कदम हे सर्वजण कार्यक्रमानिमित्त

जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा वेट अ‍ॅण्ड वॉच

इमेज
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर,  अनिल कदम  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जुलैमध्ये होणार असली तरी सुनावणी झाली तरी पावसाळ्यात या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबणीवर पडत आहेत. यापूर्वी आरक्षण पडलेले आरक्षण बदलणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या कारणांमुळे दिवाळीचा फराळ खाऊनच उमेदवार राजकीय आखाड्यात उतरतील, असे चित्र दिसत आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या असून, त्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. एप्रिल महिन्यात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. निवडणूक घेण्याबाबत यावेळी तरी नक्कीच काहीतरी निर्णय येईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात, मानेंची एंट्री

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.  जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती कर

तासगाव नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीची भिस्त रोहितदादांवर...

इमेज
 विनायक कदम, जनप्रवास तासगाव नगरपालिकेत चमत्कार घडवून सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी चालविली आहे. पक्षात अनेक इच्छुकांची देखील भाऊगर्दी झाली आहे. मात्र पालिकेत सत्तेत येण्याच्या आशेवर असलेल्या नेत्यांची राष्ट्रवादीची सगळी भिस्त युवा नेते रोहित पाटील यांच्यावरच आहे. सत्तेत येण्याआधी भाजप नेत्यांसोबत साटेलोटेच्या चर्चा थांबवत कार्यकर्त्यांना तयार करावे लागेल.  सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकत लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याचे चित्र होते. शहरातील प्रस्थापित म्हणून असलेल्या कारभार्‍यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारून रिंगणातून पळ काढला. मात्र नवख्या उमेदवारांसह कसेबसे लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र त्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला. पाच वर्षापूर्वी पराभूत मानसिकतेने निवडणूक लढवली गेली होती. मात्र, स्वर्गीय आर.आर.पाटील यांची पुण्याई मतदानातून दिसून आली. राष्ट्रवादीची व्होट बँक भक्कम असल्याचे स्पष्ट होऊन देखील गेल्या पाच वर्षात शहरात ठो

विलासराव जगताप, संग्रामसिंह, अमरसिंह देखमुखांवर अजितदादांचा डोळा

इमेज
दादा गटाकडून संपर्क, जिल्ह्यातील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष  अनिल कदम, जनप्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजितदादा या दोन गटांकडून पदाधिकारी खेचले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यात चार आमदार असून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. महापालिका क्षेत्रातील एक गट वगळता अजित पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या जुन्या मंडळींना साद घालायला सुरुवात केली आहे. जत मधील भाजपचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांना सोबत येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. भाजप, शिवसेना आणि अजित दादा गट एकत्र असल्याने हे तिन्ही नेते अजितदादांच्या गटात सामील होणार का याविषयी राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या अजितदादांनी शरद पवारांविरोधात बंड करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल

जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई

इमेज
 जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई महाविकास आघाडी मजबुतीची मदार : जिल्हा परिषद, पंचायत समितीची ‘लिटमस टेस्ट’  अमृत चौगुले, जनप्रवास राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकीकडे नव्याने बांधणीचे शिवधनुष्य पेलताना जयंत पाटील यांना जिल्ह्यात मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्याची जणू आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लिटमस टेस्टच ठरणार आहे. आतापर्यंत करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांना टप्प्यात येण्यापूर्वीच घरच्या मैदानात आऊट करण्याची फिल्डिंग लागणार हे उघड आहे. त्यामुळे आता राज्यापेक्षाही जिल्ह्यात राष्ट्रवादीला फुटीपासून रोखण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना एकसंध ठेवण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सन 1999 मध्ये काँग्रेस फुटीनंतर जिल्ह्यात काँग्रेसला तुल्यबळ राष्ट्रवादी बळकट होती व आजही आहे. अर्थात स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या पश्चात काँग्रेसची धुरा स्व.पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, स्व.मदनभाऊ पाटील यांनी सांभाळली होती, तर राष्ट्रवादीची जयंत पाटील, स्व.आर. आर.पाटील यांनी सांभाळली हो

मी जयंतरावांचाच!

इमेज
महापौर : विकासनिधी मागण्यासाठी अजितदादांकडे जनप्रवास, सांगली  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माझे मामा आहेत, माझे कौटुंबिक काम असल्याने त्यांची मुंबईत भेट घेतली होती. याचा अर्थ मी त्यांचा समर्थक आहे असा नाही. मी शरद पवार साहेब व आ.जयंत पाटील यांच्या बरोबरच आहे. मात्र भविष्यात महापालिकेसाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी व प्रलंबित शंभर कोटींसाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचा खुलासा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  राष्ट्रवादीला खिंडार पाडून अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवार व अजितदादा पवार गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरू असताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनपा क्षेत्रात खळबळ उडाली.  यावर खुलासा करताना महापौर सूर्यवंशी म्हणाले, मी उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली. ते माझे मामा लागतात. माझे घरगुती काम होते. त्यामुळे त्यांची भेट घेतली. याचा अर्थ मी त्यांचा समर्थक झालो असे होत नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुरेश खाडे यांना देखील भेटलो होतोच, म्ह

राष्ट्रवादी फुटीचा भाजपला सांगलीत फायदा

इमेज
  शरद पवळ  जनप्रवास   महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत येत्या दीड महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यात संघर्ष तीव्र होणार आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी आता आजी- माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांवर गळ टाकला जाणार आहेत. त्यांचे गट वाढविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. याचा फायदा मात्र भाजपला अधिक होणार आहे. शिवाय काँग्रेसला आपली ताकद दाखविण्यासाठी आतापासून कष्ट घ्यावे लागणार आहेत.  राज्यातील राजकारणात गेल्या चार वर्षांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणता पक्ष कोणाशी युती करेल? हे सांगणे देखील आता कठीण झाले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविली होती. त्यांना आव्हान देत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली आणि मनपा जिंकली देखील. शिवसेनेने देखील स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राज्यात

देशमुखांचे काय चुकले ?

इमेज
जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे सांगली : आटपाडी तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तसेच आटपाडीतील देशमुखांचा वाडाही बघण्यासारखा आहे. या वाड्याबद्दल लोकांमध्ये अजूनही अप्रुप आहे. स्व. बाबासाहेब देशमुख यांनी या वाड्यात बसून तालुक्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बाबासाहेब देशमुख यांच्या नंतर त्यांचे पुत्र राजेंद्रअण्णा आणि अमरसिंह देशमुख यांनीही वेळोवेळी आपली ताकद दाखविली आहे. स्व. बाबासाहेब देशमुख हे कधी आमदार झाले नाहीत. परंतु त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र राजेंद्रअण्णांनी 1995 मध्ये पूर्ण केले. राजेंद्रअण्णा अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळीपासून आटपाडीतील वाड्यातील देशमुखी राजकारण पुन्हा सुरू झाले. त्यानंतर अमरसिंह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. बँक, शिक्षण संस्था नावारूपाला आणले. परंतु कारखान्यामुळे ते गोत्यात आले. कारखान्याचे राजकारण करत असताना त्यांचे स्वत: चे राजकारण फसत गेले आणि एकामागून एक संस्था त्यांच्या ताब्यातून निघून गेल्या. आमदारकी गेली, जिल्हा बँकेचे संचालक पद गेले, मार्केट कमिटी गेली. परंतु देशमुखांना सर्वांत जास्त दुख झाले आहे ते स्व. बाबासाहेब देेशमुख यांनी स्थापन केले

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी