पोस्ट्स

बातमी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

समडोळीत 9 मार्च रोजी महामस्तकाभिषेक सोहळा

इमेज
 समडोळीत 9 मार्च रोजी महामस्तकाभिषेक सोहळा समडोळी  येथील जुने समडोळी येथील श्री 1008 भगवान आदीनाथ जिनमंदिर येथे शनिवार 9 मार्च रोजी भव्य महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष रवी खोत आणि इतर सदस्यांनी दिली.  यावेळी खोत म्हणाले, अतिशय क्षेत्र आदिगिरी येथे श्री 1008 भगवान आदिनाथ मोक्ष कल्याणक दिनानिमित्त शनिवार 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बहनमूर्तीचा महामस्तकाभिषेक होणार आहे.  यानिमित्त सकाळी 6 वाजता मंगलनिनाद, 8 वाजता ध्वजारोहण, दुपारी 3 वाजता महामस्तकाभिषेक, संध्याकाळी 6 वाजता संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी शतक महोत्सवी शतक दीपोत्सव 501 दानराशी होणार आहे. प्रति अभिषेक दानराशी 10 हजार रूपये आहे. यावेळी जलाभिषेक, नालिकाराभिषेक, इक्षुरसाभिषेक, धृताभिषेक, दुग्धाभिषेक, दग्धाभिषेक, सर्वोषधीभिषेक, कल्कचुर्णाभिषेक, कषायचूर्णाभिषेक, चतुषकोणाभिषेक, हल्दीभिषेक, चंदनाभिषेक, पुष्पवृष्टी, दीपावतरण, मध्यकलशाभिषेक, मंगलआरती आदी अभिषेक होणार आहेत.  सकाळी आठ वाजता सौ. व श्री.  नेमिनाथ आप्पासो पाटील केसुरे यांच्याहस्ते ध्वजारोहण होेणार आहे. सर्व श्रा

पाटबंधारे मालामाल शेतकरी भिके कंगाल : संदीप राजोबा

इमेज
पाटबंधारे मालामाल शेतकरी भिके कंगाल : संदीप राजोबा सांगली : गेले वर्षभर सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक  राजू शेट्टी यांनी पद यात्रेमध्ये तसेच सभा समारंभ गावभेटी यामध्ये वारंवार आपणाला महाराष्ट्र शासन व त्यांच्या जलसिंचन विभागाने पाणीपट्टी (मायनर इरिगेशन) ही दहा पटीने वाढवलेली आहे.  हा शॉक कधी लागू शकतो हे वारंवार सांगितले आहे.  निवडणुकांच्या तोंडावर शेतकर्‍यांच्यासाठी सरकार  नवनवीन योजना जाहीर करत आहे परंतु शासनाचा हा निर्णय म्हणजे एका हाताने द्यायचे व दुसर्‍या हाताने दिलेले व खिशात शिल्लक असणारे सुद्धा पैसे काढून घ्यायचे व शेतकर्‍याला पुन्हा एकदा आर्थिक गुलाम बनवायचे असा घाटच या सरकारने घातलेला आहे, असे मत संदीप राजोबा यांनी व्यक्त केले.  राजोबा पुढे म्हणाले, पूर्वी हेक्टरी 1346 रुपये प्रति गुंठा 13 रुपये 46 पैसे एकरी 538 रुपये 40 पैसे असणारी पाणीपट्टी आता हेक्टरी 13608 रुपये आकारणी करणार आहे. म्हणजे 136 रुपये 08 पैसे प्रति गुंठा प्रमाणे आकारणी होणार म्हणजे एकरी 5430 रुपये 20 पैसे प्रमाणे होणार आहे. जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली असता एक तर आपले नगदी पीक म्हणून उसाकडे

शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

इमेज
 शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-  रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील उड्डाणपूलावरील सिमेंटच्या कठड्याला भरधाव वेगात असलेल्या क्रेटा गाडीने जोरदार धडक देऊन झालेल्या आपघातात तीन जन जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात सोमवारी सायंकाळी 4.30 दरम्यान घठला आपघातातील मृत व जखमी हे कोल्हापूर येथील आहेत. अपघातात कोल्हापूर येथील छत्रपती पार्क, रमण मळा येथील सुर्यकांत दगडू जाधव,(वय 56) गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव हे तिघेजण जागीच ठार झाले असून प्रशांत पांडुरंग चिले हे गंभीर जखमी झाले आहेत.हे सर्वजण कोल्हापूर येथील छत्रपती पार्क रमण मळा येथील रहिवशी आहेत. पोलीस सूत्राकडून व घटनास्थळा वरून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोल्हापूर सराफी व्यवसायिक असलेले जाधव कुटुंबीय एम.एच.09/ जी एफ- 8323 या क्रेटा बनावटीच्या गाडीने पंढरपूर हून कोल्हापूर कडे जात होते.शिरढोण येथील उड्डाणपूलावरील कठड्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उड्डाणपूलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरदार आदळली. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले

विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त

इमेज
 विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त प्रसिद्ध जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ’आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे जाऊन आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती. डोंगरगडमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माँ बामलेश्वरी मंदिरातही मोदींनी पूजा केली होती. वर्षानुवर्षे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथी

जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,

इमेज
जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,  77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर डोंगरगड : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमधील सदलगा येथे झाला होता.  संत आचार्य विद्यासागर महाराजांनी घेतली समाधी दिगंबर जैन आचार्य होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच्यावर रविवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  आज पंचतत्वात होणार लीन जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री 2.30 वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचे निधन झाले. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-ज

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

इमेज
 विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार गोंदिया : जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या  गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा जवळील पानगाव येथे हा भीषण अपघात झाला. पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये गाडी कोसळली असून कालव्यामध्ये पाणी असल्याने यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे भाविक जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातात तिघे जागीच ठार दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्य दर्शनाला  जात असताना हा अपघात झाला आहे. मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक काल, 17 फेब्रुवारीला रात्री निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये त्यांची कार कोसळली. दरम्यान का

पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न

इमेज
 माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर दिल्ली : काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाऊंटवर पंतप्रधान मोदी यांनी तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आ

RAJARAMBAPU PATIL : लोकनेते राजारामबापू पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

इमेज
 स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना प्रतिक पाटील समवेत माजी मंत्री आ.जयंतराव पाटील RAJARAMBAPU PATIL :  लोकनेते राजारामबापू पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन इस्लामपूर : प्रतिनिधी लोकनेते राजारामबापू पाटील यांना 40 व्या स्मृतिदिनानिमित्त राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असंख्य मान्यवर व हजारो बापूप्रेमींनी त्यांच्या पुतळ्यास भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, दिलीपतात्या पाटील, महेंद्र लाड, अँड.बाबासाहेब मुळीक, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, मन्सूर खतीब, माजी सभापती पै.धनपाल खोत, शेखर माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे-पाटील यांनी स्व. बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.  राज्य शासनाच्या वतीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार प्रदीप उबाळे, बाजार समितीच्या वतीने सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आपुगडे यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार

इस्लामपुरात कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

इमेज
कुस्ती स्पर्धेसाठी टाकलेली अद्यावत मॅट, व्यासपीठ, गॅलरी इस्लामपुरात कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी   इस्लामपूर :  राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी 17 रोजी पुरुष व महिला मानधन कुस्ती स्पर्धा होत असून, या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 15 वर्षानंतर ही मानधन कुस्ती स्पर्धा होत असल्याने कुस्ती मल्ल व कुस्ती प्रेमींमधून या स्पर्धेचे जोरदार स्वागत केले जात आहे. राजारामबापू कुस्ती केंद्राच्या मैदानात होणार्‍या या स्पर्धेचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याहस्ते दुपारी 3 वाजता उदघाटन केले जाणार आहे. लोकनेते राजारामबापू पाटील हे बडोदा विद्यापीठाचे चॅम्पियन होते. त्यांनी असंख्य पैलवानांना सातत्याने सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पश्चात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अद्यावत कुस्ती केंद्र सुरू करून कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांना अद्यावत प्रशिक्षण व मानधन कुस्ती स्पर्धेतून आर्थिक आधार दिला होता.  स्व.मानसिं

दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप ते 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद; शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास

इमेज
पुणे : पुण्यात आज (5 जानेवारी) भरदिवसा झालेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. कोथरूडमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारत कुख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळ याच्यावर गोळीबार केला. त्याला तातडीने कोथरूड परिसरातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात गँगवॉरची चर्चा सुरु झाली आहे.    हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना  शरद मोहोळच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शरद मोहोळवर झालेला हल्ला आर्थिक वादातून टोळी युद्धातील अंतर्गत वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू असल्याचे पुणे शहर पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी सांगितले. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, मोहोळ येथे दुपारी दीडच्या सुमारास तीन ते चार जणांनी गोळीबार केला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. हत्येनंतर शरद मोहोळचे शेकडो समर्थक ससून रुग्णालयासमोर जमा झाले होते.  किमान 15 गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार शरद मोहोळ हा सुम

उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ

इमेज
  उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ    उदगाव (ता.शिरोळ) कुंजवन येथील आदि - संन्मती समाधी तीर्थक्षेत्रावर भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास भव्य सवाद्य मिरवणूक व ध्वजारोहणाने दिमाकदार सोहळ्यात प्रारंभ झाला. याप्रसंगी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज व मुनीश्री पियूषसागर महाराज यांच्या ससंघ सानिध्यात विविध धार्मिक विधी संपन्न झाले. उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ    सकाळी कुंजवन येथून गावांमधील  भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व मुख्य मार्गावरून भगवंतांची भव्यकलश मिरवणूक काढण्यात आली. या हत्ती, घोडे, बँडपथक, महिलांचे ढोल पथक, रथ यांच्यासह 108 सौभाग्यवती महिला, 56 कुमारिका डोक्यावर मंगलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर विधीवत ध्वजारोहण व मंडप शुद्धीकरण करून भगवंतांची मूर्ती मंडपात ठेवण्यात आली. ध्वजारोहण प्रवीण - विशाल जैन कासलीवाल हल्दीवाला परिवार नांदेड यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी पंडित प्रदीप मधुर यांनी मंत्रविधी केली. सुशोभिकरण व नूतनीकरण करण्यात आलेल्या मूलनायक भगवान महावीर गर्भगृहाचा लोकार्पण सोहळा तसेच पंचामृत अभिषेक मान्यव

बेडग सरपंच उमेश पाटील व उपसरपंच मल्हारी नागरगोजे यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

जनप्रवास प्रतिनिधी मिरज मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  स्वागत कमान पाडल्याच्या आरोपाखाली बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश शंकर पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द अखेर मिरज ग्रामीण पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार महादेव कांबळे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.   सरपंच, उपसरपंचावरील या कारवाईनंतर बेडग गांव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तर स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट दिली. स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निशिकांत पाटील

इमेज
शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग, प्रदेशाध्यक्षांकडून निवडी जाहीर  जनप्रवास  सांगली   मागील चार महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी अखेर पार पडल्या. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची तर शहर जिल्हाध्यक्षपदी कुपवाडचे नगरसवेक प्रकाश ढंग यांची निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडी जाहीर केल्या.  भाजप जिल्ह्यात भाकरी फिरवणार असून संघटनात्मक बदल करणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवड होणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले होते. मात्र निवडींबाबत एकमत होत नसल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अखेर बुधवारी त्याला मुर्हूत मिळाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्षाच्या ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदावर नवीन निवडी जाहीर केल्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निशिकांतदादा पाटील यांच्यासह संग्रामसिंह देशमुख यांचे नाव चर्चेत होते. पाटील यांची अपेक्षेप्रमाणे

अभिमानास्पद... चांद्रयान मोहिमेत सांगलीकरांचा वाटा : यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग बनवले सांगलीतील कारखान्यात.

इमेज
देशाला अभिमान वाटावा अशा ‘चंद्रयान अभियानात सांगलीच्या उद्योजकानेही हातभार लावला. यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग सांगली औद्योगिक वसाहतीतील संदीप सोले यांनी केले आहे.. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम सोले यांच्या कंपनीमध्ये होत आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चांद्रयान-३ चे यशस्व प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग माधवनगरमध्ये असलेल्या सोले यांच्या डॅझल डायनाकोटस कंपनीमध्ये हे कोटिंग करण्यात आले. आतापर्यच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम यांच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले होते. संदीप सोले व त्यांचे सुपुत्र निहार सोले यांनी कामगिरी पार पाडली. ‘चंद्रयान मोहिमेचे सुटे भाग तीन वर्षांपूर्वी कोटिंगसाठी त्यांच्याकडे आले होते. इस्त्रोने काढलेल्या टेंडरद्वारे त्यांना हे काम मिळाले. सांगलीकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली. यान अवकाशात सोडले जा

शेतकरी नेत्यांशिवाय ऊस दर नियंत्रण समिती

इमेज
राज्य सरकारचा कारभार : राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटलांना डच्चू! जनप्रवास   राज्यभरातील शेतकर्‍यांच्या ऊसाला भाव मिळावा, यासाठी झटणार्‍या शेतकरी नेत्यांनाच वगळून शिंदे - फडणवीस सरकारकडून ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांचं राज्य सरकारला वावडं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकर्‍यांचं सरकार असा डांगोरा पिटला जात असतानाच ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी लढा देत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांना बाजूला करण्यात आले आहे.  गेल्या वर्षभरापासून ऊस दर नियंत्रण समिती नसल्याने राजू शेट्टी यांनी सातत्याने इशारा, आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. दरम्यान, ऊस दर नियंत्रण समितीमध्ये सुहास पाटील, सचिनकुमार नलवडे, पृथ्वीराज जाचक, धनंजय भोसले, योगेश बर्डे यांचा समावेश   करण्यात आला आहे. साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैला

जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित

इमेज
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 86   ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक  जनप्रवास , आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप, नमुना ब सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय स्तरावर करण्यात आला. त्याच्यावर कोणतीही हरकत दाखल झालेली नसल्याने अंतिम आरक्षण निश्चित करण्यात आल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.  जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. 27 जून 2023 ते दि. 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये प्राप्त होणार्‍या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेऊन दिनांक 12 जुलै 2023 रोजी अंतिम करून परिशिष्ट 16 मधील अधिसूचना, नमुना - अ दिनांक 14 जुलै 2023 रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी आणि भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे. उर्वरित 84 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणासंदर्भात

ड्रायपोर्ट करा नाहीतर लॉजिस्टीक पार्क, पण सांगलीला काहीतर द्या

इमेज
बेरोजगार तरूणांच्या हाताला काम: शेतीमालाला मिळेल बाजारपेठ जनप्रवास  सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट होणार, तीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार, शेतीमाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार, या आशेवर तरूण व शेतकरी बसले होते. मात्र जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीने ड्रायपोर्ट जिल्ह्यात नव्हे तर राज्यात होणार नसल्याचे स्वच्छ पत्र दिले. आता सलगरेमध्ये लॉजिस्टीक पार्क होण्याचे नवे स्वप्न सांगलीकरांना मिळाले आहे. त्यामुळे चार हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्याचा विकास देखील मागे पडला आहे. त्यामुळे ड्रायपोर्ट असो किंवा लॉजिस्टीक पार्क काही तर सांगलीसाठी करा, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.  खासदार संजयकाका पाटील यांनी पाच वर्षांपासून रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टचा प्रस्ताव मांडला होता. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ग्रीन सिग्नल दाखवला होता. त्यानुसार येथील 37 हेक्टर खासगी जमीन आणि 91 हेक्टर शासकीय जमिनीवर रांजणी ड्रायपोर्टचा प्रस्ताव होता. शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्याचा प्रस्

सदाशिवराव पाटील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी डिजीटल बॅनरद्वारे व्यक्त केल्या भावना

इमेज
  "आता वेळ निर्णयाची"  भूमिकेकडे लागल्या नजरा प्रताप मेटकरी : जनप्रवास विटा         राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि ॲड. सदाशिवराव पाटील यांचे छायाचित्र असलेल्या डिजीटल बॅनरवर "आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशा शब्दांत भावना व्यक्त करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या लक्षवेधी बॅनरमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.        सध्या राज्याच्या राजकारणामध्ये  धक्कादायक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा कार

जिल्ह्यात 600 सेवानिवृत्त गुरुजी सेवेत येणार

इमेज
945 शिक्षकांच्या रिक्त जागा, गरजेच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार  जनप्रवास । प्रतिनिधी  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त जागांचा प्रश्न कायम असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. जिल्ह्यात विषय शिक्षक आणि उपशिक्षकांच्या मिळून 945 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची गरज  असलेल्या 600 ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांकडून माहिती मागविली आहे.  उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरु झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे पवित्र’ पोर्टलमार्फत नियमित शिक्षण संस्थांच्या अ

निवडणुकीच्या तोंडावर खासदारांकडून ड्रायपोर्टची बनवाबनवी

इमेज
जनप्रवास  प्रतिनिधी सांगली: जिल्ह्यात कधी रांजणी तर कधी सलगरे या ठिकाणी ड्रायपोर्ट करण्याचे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजयकाका पाटील यांनी दिले होते. मात्र जवाहर नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीने ड्रायपोर्ट होणार नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे खासदारांच्या अशा बनवाबनवीला जनता बळी पडणार नाही. येणार्‍या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी खासदारांना  ट्विटव्दारे  दिला. गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारणीचा गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात रांजणी किंवा सलगरे येथे डायपोर्ट होणार? अशी आशा जिल्ह्याला होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी दिलेल्या माहिती अधिकार कायद्यामुळे ड्रायपोर्टचा भूलभुलैय्या उजेडात आला आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील ड्रायपोर्टला स्थगिती दिली असल्याचे पत्र जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्टने साखळकर यांना दिले आहे. यामुळे काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी खासदार संजयकाकांवर ट्विटव्दारे निशाना साधला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून ज

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी