पोस्ट्स

सांगली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

आवटी, बागवानांची पार्श्वभूमी पाहूनच पक्षात घेणार

इमेज
  या लोकांच्या बाबत काय निर्णय घ्यायचा ते अजितदादा मला विचारूनच घेतील, असा विश्वास माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.     आवटी, बागवानांची पार्श्वभूमी पाहूनच पक्षात घेणार  : इद्रीस नायकवडी मिरज प्रतिनिधी  जिल्ह्यातील काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले अजितदादांना दररोज हजारो लोक भेटत असतात. मिरजेतील आवटी व बागवान परिवार त्यांच्या भेटीसाठी गेले असले तरी त्यांनी अधिकृत पक्ष प्रवेश केला की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र पक्षप्रवेश ही साधी गोष्ट नसून आम्ही त्या लोकांची पार्श्वभूमी पाहूनच योग्य तो निर्णय घेणार आहोत  इद्रीस नायकवडी पुढे म्हणाले , सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने घेतलेले सर्वच निर्णय हे जनविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि दूरगामी विकास साधणारे आहेत. यात विशेषता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यापुढेही यात कोणताही खंड पडणार नाही, असा विश्वास माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख

जैन सभेला विजय कासारांचे दातृत्व

इमेज
जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांना दानचिंतामणी पुरस्कार देताना रावसाहेब पाटील, एन. डी. बिरनाळे  जैन सभेला विजय कासारांचे दातृत्व  रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन जनप्रवास । प्रतिनिधी  सांगली : जैन सभेच्या वसतिगृहात शिकून यशस्वी झालेले विजय कासार यांनी सभेला 10 लाखाचे दान दिले आहे. पुन्हा सभेच्या शिष्यवृत्ती निधीला 1 लाख व कोल्हापूर जैन बोर्डिंगला 50 हजाराचे दान दिले. समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. दिगंबर जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांचा मानपत्राने दानचिंतामणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब पाटील बोलत होते. जैन सभेच्या उपकाराची जाणीव ठेवून वेळोवेळी दान देऊन सभेचा पर्मनंट देणगीदार म्हणून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे दक्षिण भारत जैन सभेचा शिष्यवृत्ती निधी लवकरच 5 कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी कासार हे खरे जैन तत्वज्ञान जगतात. सभेच्या शिष्यवृत्ती निधीला त्यांनी भरभरुन दान दिल्याने त्याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना होत आहे.  यावेळी विजय

सांगलीकरांना श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचा लाभ सांगलीतच...

इमेज
श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद  सांगलीतच...  -------पृथ्वीराज पाटील  कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतीम टप्प्यात...   आयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. सन १९८६ साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी आयोध्येतील श्रीराम मंदीराचे दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला.  प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत. आयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते. पण आजघडीला ते शक्य होईलच असे नाही. सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहेतूनी आम्ही नेमिनाथनगर येथे कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. मंदिर उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे.  या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात आयोध्या नगरीत विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा

जिल्हा नियोजन समितीवर वैभव पाटील, जगदाळेंसह अजितदादा गटाचे चार जण

इमेज
जनप्रवास । प्रतिनिधी सांगली: सांगली जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह चार जणांची वर्णी लागली आहे. विशेष निमंत्रित म्हणून या सदस्यांच्या निवडी शासनाकडून सोमवारी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सदस्यांच्या निवडी होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या चार जणांची वर्णी लावून अजितदादांनी भाजप-शिवसेनाला धक्का दिला आहे.  जिल्हा नियोजन समितीवर वैभव पाटील, जगदाळेंसह अजितदादा गटाचे चार जण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार गटाने ताकद वाढविण्यास सुरूवात केली. माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील व पद्माकर जगदाळे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला होता. दादांनी वैभव पाटील यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तर जगदाळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर अनेकजण अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत. जिल्ह्यात अजितदादा गटाची ताकद वाढत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर अजितदाद

स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली मोहिमेला ‘प्लागॅथॉन’ने सुरवात

इमेज
 स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली मोहिमेला ‘प्लागॅथॉन’ने सुरवात जनप्रवास । प्रतिनिधी सांगली: ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ ही संकल्पना कृतीशील उपक्रमातून साकारण्याच्या मोहिमेला रविवारी ‘प्लॅगाथॉन’ने सुरवात झाली. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशन यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी शहरातील प्रमुख पेठांतून स्वच्छतेसाठी एकजुटीने पाऊल उचलण्यात आले. त्यात विविध संस्था, संघटना सहभागी झाल्या. पृथ्वीराज पाटील यांनी सन 2024 मध्ये वर्षभर सांगली पंचक्रोशीचे आणि सांगलीकरांचे आरोग्य या विषयावर प्राधान्याने कामाचा निश्चिय केला आहे. त्यात शुद्ध पाण्यासह सामाजिक आणि व्यक्तीगत आरोग्यासाठी सांगलीकरांच्या हातात हात गुंफून काम केले जाणार आहे. त्याची सुरवात सकाळी चालण्याचा व्यायाम करत करत कचरा वेचणे आणि तो एकत्रित करणे, या स्वरुपात म्हणजेच प्लॅगाथॉनने झाली.  पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘स्वच्छता ही एक दिवसाची प्रक्रिया नाही. ती सवय बनली पाहिजे. त्यासाठी व्यापक कार्यक्रम घेवून आम्ही तळागाळात पोहचत आहोत. ज

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

इमेज
सांगली : सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा 58 वा वाढदिवस रविवार दि. 31 डिसेंबरला विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होणार आहे.  पृथ्वीराज पाटील फौंडेशन व काँग्रेस कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रमांची जय्यत तयारी केली आहे. तर वसंत कॉलनीतील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारतील, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी दिली आहे.  पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने सकाळी सात वाजता राजवाडा चौक ते श्री गणपती मंदीर दरम्यान प्लॅगॉथॉन म्हणजे जॉगिंग करत कचरा बॅगेत भरुन बॅग जमा करणे हा ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ अंतर्गत उपक्रम होईल. महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते प्रारंभ होईल. सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीरे होतील. ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे व आधार काठी वाटप तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षासाठी कायम योगदान दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा काँग्रेस कमिटीतर्फे विविध प्रभागात सत्कार केला जाईल.  बिसूरमध्ये पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे 60 किलो वजन गटाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील गव

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला:

इमेज
माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन  :रंजल्या गांजल्यांचा आवाज हरपला: माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन  :रंजल्या गांजल्यांचा आवाज हरपला:  राजकारनातील विचारांशी तत्वनिष्ठ असणारा  शेवटचा तारा निखळला : कुपवाड : जनसामान्यांचे आधारवड कुपवाडचे सुपुत्र, विधानसभा व विधानपरिषदेचे माजी सदस्य, ज्येष्ठ पुरोगामी नेते प्रा. शरद रामगोंडा पाटील यांचे त्यांच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान  निधन झालं.वयाच्या ८१ व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही महिन्यापासून आजारी होते. त्यांच्या निधनाने कुपवाड शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्य माणूस पोरका झाला असून सामाजिक, राजकिय पटलावरील सर्वसामान्यांच, रंजल्या गंजल्याल्यांच नेतृत्व हरपले आहे .कुपवाड परिसरातील सर्व व्यवसायिकांनी , व्यापाऱ्यानी,  एक दिवसाचा  दुखवटा पाळत सर्व व्यवहार बंद ठेवले. शहरातील सर्व शाळा व्यवस्थापनाने एक दिवसाची सुट्टी जाहिर करण्यात आली.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ,वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती,पुरोगामी चळवळीच्या नेत्यांनी,कार्यकर्त्यानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होत

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

सांगलीत भाजप सुसाट, काँग्रेसमध्ये मतभिन्नता

इमेज
आ. सुधीर गाडगीळ यांची विकास कामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल  अनिल कदम जनप्रवास  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप सुसाट असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभिन्नता असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी सांगली शहरासह ग्रामीण भागात कामांचा सपाटा लावला आहे. रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सांगली-पेठ रस्ता, कवलापूर विमानतळाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. जनसंपर्काच्या माध्यमातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे गाडगीळ विधानसभेतील मार्ग सुकर असल्याचे चित्र दिसून येते. भाजपचे सांगली मतदारसंघातील आमदार गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे आठ वर्षापुर्वी कुणालाही वाटले नव्हते. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ

इमेज
अमृत चौगुले भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे.  उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निशिकांत पाटील

इमेज
शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग, प्रदेशाध्यक्षांकडून निवडी जाहीर  जनप्रवास  सांगली   मागील चार महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी अखेर पार पडल्या. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची तर शहर जिल्हाध्यक्षपदी कुपवाडचे नगरसवेक प्रकाश ढंग यांची निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडी जाहीर केल्या.  भाजप जिल्ह्यात भाकरी फिरवणार असून संघटनात्मक बदल करणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवड होणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले होते. मात्र निवडींबाबत एकमत होत नसल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अखेर बुधवारी त्याला मुर्हूत मिळाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्षाच्या ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदावर नवीन निवडी जाहीर केल्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निशिकांतदादा पाटील यांच्यासह संग्रामसिंह देशमुख यांचे नाव चर्चेत होते. पाटील यांची अपेक्षेप्रमाणे

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल. सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा

जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा वेट अ‍ॅण्ड वॉच

इमेज
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर,  अनिल कदम  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जुलैमध्ये होणार असली तरी सुनावणी झाली तरी पावसाळ्यात या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबणीवर पडत आहेत. यापूर्वी आरक्षण पडलेले आरक्षण बदलणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या कारणांमुळे दिवाळीचा फराळ खाऊनच उमेदवार राजकीय आखाड्यात उतरतील, असे चित्र दिसत आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या असून, त्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. एप्रिल महिन्यात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. निवडणूक घेण्याबाबत यावेळी तरी नक्कीच काहीतरी निर्णय येईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

अभिमानास्पद... चांद्रयान मोहिमेत सांगलीकरांचा वाटा : यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग बनवले सांगलीतील कारखान्यात.

इमेज
देशाला अभिमान वाटावा अशा ‘चंद्रयान अभियानात सांगलीच्या उद्योजकानेही हातभार लावला. यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग सांगली औद्योगिक वसाहतीतील संदीप सोले यांनी केले आहे.. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम सोले यांच्या कंपनीमध्ये होत आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चांद्रयान-३ चे यशस्व प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग माधवनगरमध्ये असलेल्या सोले यांच्या डॅझल डायनाकोटस कंपनीमध्ये हे कोटिंग करण्यात आले. आतापर्यच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम यांच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले होते. संदीप सोले व त्यांचे सुपुत्र निहार सोले यांनी कामगिरी पार पाडली. ‘चंद्रयान मोहिमेचे सुटे भाग तीन वर्षांपूर्वी कोटिंगसाठी त्यांच्याकडे आले होते. इस्त्रोने काढलेल्या टेंडरद्वारे त्यांना हे काम मिळाले. सांगलीकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली. यान अवकाशात सोडले जा

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात, मानेंची एंट्री

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.  जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती कर

शेतकरी नेत्यांशिवाय ऊस दर नियंत्रण समिती

इमेज
राज्य सरकारचा कारभार : राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटलांना डच्चू! जनप्रवास   राज्यभरातील शेतकर्‍यांच्या ऊसाला भाव मिळावा, यासाठी झटणार्‍या शेतकरी नेत्यांनाच वगळून शिंदे - फडणवीस सरकारकडून ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांचं राज्य सरकारला वावडं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकर्‍यांचं सरकार असा डांगोरा पिटला जात असतानाच ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी लढा देत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांना बाजूला करण्यात आले आहे.  गेल्या वर्षभरापासून ऊस दर नियंत्रण समिती नसल्याने राजू शेट्टी यांनी सातत्याने इशारा, आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. दरम्यान, ऊस दर नियंत्रण समितीमध्ये सुहास पाटील, सचिनकुमार नलवडे, पृथ्वीराज जाचक, धनंजय भोसले, योगेश बर्डे यांचा समावेश   करण्यात आला आहे. साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैला

जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित

इमेज
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 86   ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक  जनप्रवास , आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप, नमुना ब सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय स्तरावर करण्यात आला. त्याच्यावर कोणतीही हरकत दाखल झालेली नसल्याने अंतिम आरक्षण निश्चित करण्यात आल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.  जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. 27 जून 2023 ते दि. 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये प्राप्त होणार्‍या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेऊन दिनांक 12 जुलै 2023 रोजी अंतिम करून परिशिष्ट 16 मधील अधिसूचना, नमुना - अ दिनांक 14 जुलै 2023 रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी आणि भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे. उर्वरित 84 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणासंदर्भात

ड्रायपोर्ट करा नाहीतर लॉजिस्टीक पार्क, पण सांगलीला काहीतर द्या

इमेज
बेरोजगार तरूणांच्या हाताला काम: शेतीमालाला मिळेल बाजारपेठ जनप्रवास  सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट होणार, तीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार, शेतीमाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार, या आशेवर तरूण व शेतकरी बसले होते. मात्र जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीने ड्रायपोर्ट जिल्ह्यात नव्हे तर राज्यात होणार नसल्याचे स्वच्छ पत्र दिले. आता सलगरेमध्ये लॉजिस्टीक पार्क होण्याचे नवे स्वप्न सांगलीकरांना मिळाले आहे. त्यामुळे चार हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्याचा विकास देखील मागे पडला आहे. त्यामुळे ड्रायपोर्ट असो किंवा लॉजिस्टीक पार्क काही तर सांगलीसाठी करा, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.  खासदार संजयकाका पाटील यांनी पाच वर्षांपासून रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टचा प्रस्ताव मांडला होता. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ग्रीन सिग्नल दाखवला होता. त्यानुसार येथील 37 हेक्टर खासगी जमीन आणि 91 हेक्टर शासकीय जमिनीवर रांजणी ड्रायपोर्टचा प्रस्ताव होता. शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्याचा प्रस्

जिल्ह्यातील कारखानदारीत तिसरी पिढी कार्यरत

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास कुंडलच्या जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मंगळवारी शरद लाड यांची निवड झाली. जी. डी. लाड यांनी स्थापन केलेल्या या कारखान्यात सुरूवातीला जी. डी. लाड, त्यानंतर त्यांचे सुपूत्र आमदार अरूणअण्णा लाड आणि आत्ता अरूण आण्णांचे चिरंजिव शरद लाड यांची निवड झाली आहे. जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात सांगली साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील आणि आता शरद लाड यांच्या रूपाने तिसरी पिढी सहकार क्षेत्रात पदार्प ण केले आहे. तरूणांच्या हातात आता सहकार क्षेत्र येत आहे, याचेच हे द्योतक आहे. नगरच्या विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतार सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी सभासदांकडून प्रत्येक पाच रूपयाचे शेअर्स घेतले होते. विठृठलराव विखे पाटील यांच्यानंतर सहकार क्षेत्र महाराष्ट्रभर पसरले. सांगलीतही स्व. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, संपतराव माने, दिनकरआबा पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी विखे पाटील यांच्या पाव

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी