MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार


 दिनेशकुमार ऐतवडे


क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल.

सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा काळ कोणालाही विधानसभेत टिकता आले नाही. अगदी वसंतदादाही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल होते. परंतु तेही केवळ 1952, 1957, 1962 आणि 1978 असे चार वेळा विधानसभा जिंकले. 1967 आणि 1972 ची निवडणूक ते लढले नाहीत. या काळात ते विधानपरिषदेवर होते.

राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर अमेरिकेत असणार्‍या जयंत पाटील यांना राजकारणात ओघानेच यावे लागले. 1984 मध्ये जयंत पाटील यांनी राजकारणाची सूत्रे आपल्या हातात घेतली. सुरूवातीला त्यांना राजारामबापू कारखान्याचे चेअरमन करण्यात आले. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाग घेता आला असता परंतु त्यांनी गडबड केली नाही. त्या निवडणुकीत त्यांनी स्व.नागनाथअण्णा पाटील यांना पाठिंबा देवून निवडून आणले. पाच वर्षे त्यांनी मतदार संघाचा संपूर्ण अभ्यास केला. सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि 1990 च्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. यातील पहिल्या चार निवडणुका या पूर्वीच्या वाळवा मतदार संघातून तर गेल्या तीन निवडणुका इस्लामपूर मतदार संघातून लढले. 

या सातही निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सातही निवडणुकीत त्यांच्या समोर जे जे निवडणुकीला प्रमुख उमेदवार होते ते परत त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आले नाहीत. जयंत पाटील यांनी आजपर्यंत विलासराव शिंदे, रघुनाथदादा पाटील, बाबा सूर्यवंशी, प्रा. विश्वास सायनाकर, अशोक पाटील, सी.बी.पाटील आप्पा, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, जितेंद्र पाटील, गौरव नायकवडी आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा आजपर्यंत पराभव केला आहे. जयंत पाटील यांचे 2014 मधील 75 हजाराचे मताधिक्य आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य आहे.

आमदार जयंत पाटील यांनी आपली पहिली निवडणूक वयाच्या 27 व्या वर्षी लढवली. 1990 मध्ये काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळाले. त्यांच्या विरोधात आष्ट्याचे विलासराव शिंदे होते. विलासराव शिंदे यांनी 1978 मध्ये राजारामबापुंचा पराभव केला होता. त्याच विलासराव शिंदेंचा पराभव करून जयंत पाटील यांनी आपल्या आमदारकीची सुरूवात केली.

सध्या जयंत पाटील राज्यपातळीवरील प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला तर शरद पवारांवरील आपली निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही. आज राज्याच्या राष्ट्रवादीची जबाबदारी त्यांच्या खात्यावर आहे. संपूर्ण इस्लामपूर मतदार संघ आजही त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून आहे. जयंत पाटील बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण या प्रमाणे कार्यकर्ते त्यांच्यावर निष्ठा ठेवून आहेत. 


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी