SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतूनच लढवणार आहे. शेतकर्यांच्या जीवावर स्वतंत्रपणे एक नोट व एक वोट या तत्त्वावर 22 वर्षानंतर सुद्धा मतदारसंघात आपल्याला निवडणुकीत उमेदवाराला पैसे द्यावे लागतात. हा विश्वास मतदारांच्यात जागृत ठेवला ही गोष्ट अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन माजी खा.राजू शेट्टी यांनी केले.
तांबवे ता.वाळवा येथे हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबीरप्रसंगी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर येथे महामार्ग रोखल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 15 लाख शेतकर्यांना 650 कोटी रुपये मिळवून दिले आहेत. माझी निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शेतकरी हातात घेणार आहे.
त्यामुळे मला निवडणुकीची काळजी नाही. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, अॅड.एस.यु.संदे, शिवाजीराव पाटील, संदिप राजोबा, संजय बेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.संजय थोरात म्हणाले, शेती आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर व्यापक जनजागृती करण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आले आहे. असंघटित असणारा शेतकरी संघटित होऊ लागला. शेतकर्यांच्या प्रश्नावर लढणारे एकमेव नेतृत्व म्हणजे राजू शेट्टी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यावेळी शिवाजी पाटील, शंकर पाटील, उत्तम जाधव, दत्ताजी पाटील, रामचंद्र जाधव, सुशांत पाटील, दिलीप जाधव, भास्कर मोरे, यशवंत पाटील उपस्थित होते. भागवत जाधव यांनी सुत्रसंचलन केले. रविकिरण माने यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा