MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून स्वतंत्रपणे लढवणार : राजू शेट्टी



 हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून स्वतंत्रपणे लढवणार : राजू शेट्टी 

इस्लामपूर ः प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतूनच लढवणार आहे. शेतकर्‍यांच्या जीवावर स्वतंत्रपणे एक नोट व एक वोट या तत्त्वावर 22 वर्षानंतर सुद्धा मतदारसंघात आपल्याला निवडणुकीत उमेदवाराला पैसे द्यावे लागतात. हा विश्वास मतदारांच्यात जागृत ठेवला ही गोष्ट अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन माजी खा.राजू शेट्टी यांनी केले. 

तांबवे ता.वाळवा येथे हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबीरप्रसंगी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर येथे महामार्ग रोखल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 15 लाख शेतकर्‍यांना 650 कोटी रुपये मिळवून दिले आहेत. माझी निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शेतकरी हातात घेणार आहे. 

त्यामुळे मला निवडणुकीची काळजी नाही. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, अ‍ॅड.एस.यु.संदे, शिवाजीराव पाटील, संदिप राजोबा, संजय बेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.संजय थोरात म्हणाले, शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर व्यापक जनजागृती करण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आले आहे. असंघटित असणारा शेतकरी संघटित होऊ लागला. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणारे एकमेव नेतृत्व म्हणजे राजू शेट्टी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यावेळी शिवाजी पाटील, शंकर पाटील, उत्तम जाधव, दत्ताजी पाटील, रामचंद्र जाधव, सुशांत पाटील, दिलीप जाधव, भास्कर मोरे, यशवंत पाटील उपस्थित होते. भागवत जाधव यांनी सुत्रसंचलन केले. रविकिरण माने यांनी आभार मानले.   

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी