SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिनसलय. ठाकरे गट उमेदवार देणार असल्याने राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांची आज 10 मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन मतविभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी एक जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यात सुरु होती. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येही शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लढत होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता ठाकरे गटाकडून हातकणंगले मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहे. दरम्यान, राजू शेट्टी स्वबळावर लढले आणि ठाकरे गटाने उमेदवार दिला तर मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. या निवडणुकीत धैर्यशील मानेंना 5,85, 776 मते मिळाली तर राजू शेट्टींना 4,89,737 मतं पडली होती. त्यामुळे शेट्टींना 96 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, तेव्हा शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वात निवडणूक लढली होती. आता शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा