MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी



 अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी 

 हसन मुश्रीफांशी पंगा भोवला

बिद्री साखर कारखान्यामध्ये हसन मुश्रीफांविरोधात घेतलेला पंगा ए. वाय. पाटील यांना भोवला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. 

 

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वैर पत्करून थेट शिंदे गटाशी जवळीक साधलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिद्री साखर कारखान्यामध्ये हसन मुश्रीफांविरोधात घेतलेला पंगा ए. वाय. पाटील यांना भोवला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. 




ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर यांना पराभवाचा धक्का

नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झाली होती. तथापि, बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली होती.. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव केला. विरोधी गटाकडून कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक बाबासाहेब हिंदुराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांना पराभव पत्करावा लागला.  

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधी आघाडीने कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यात जोरदार प्रचार केला होता. मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील हे दोघे या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने उभे ठाकले होते. मुश्रीफांनी सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व केले. तर मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी आघाडीने ही निवडणूक लढविली. बिद्रीसाठी एकूण 56 हजार 91 सभासदांपैकी 49 हजार 940 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ए. वाय.पाटील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असतानाही त्यांनी विरोधी आघाडीला साथ दिली होती. दारुण पराभवानंतर ए. वाय. पाटील भाजप वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.




आता जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्याने ए. वाय. पाटील काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी