SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली: सांगली जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह चार जणांची वर्णी लागली आहे. विशेष निमंत्रित म्हणून या सदस्यांच्या निवडी शासनाकडून सोमवारी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सदस्यांच्या निवडी होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या चार जणांची वर्णी लावून अजितदादांनी भाजप-शिवसेनाला धक्का दिला आहे.
जिल्हा नियोजन समितीवर वैभव पाटील, जगदाळेंसह अजितदादा गटाचे चार जण
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार गटाने ताकद वाढविण्यास सुरूवात केली. माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील व पद्माकर जगदाळे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला होता. दादांनी वैभव पाटील यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तर जगदाळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर अनेकजण अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत. जिल्ह्यात अजितदादा गटाची ताकद वाढत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर अजितदादांनी पवार यांनी आपल्या चार समर्थकांची विशेष निमंत्रित म्हणून वर्णी लावून घेतली आहे.
लकमंत्र्यांनी शिफारस केली नसल्याने या निवडी रखडल्या होत्या.
यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, सनमडी (ता. जत) चे सुनील पवार, करगणी (ता. आटपाडी) च्या पुष्पा जयवंतराव पाटील यांची निवड झाली आहे. शासनाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांनी या संदर्भातील अध्यादेश सोमवारी काढला. सांगली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही जणांची निवड करण्यात येणार होती. मात्र पालकमंत्र्यांनी शिफारस केली नसल्याने या निवडी रखडल्या होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाने बाजी मारत शिवसेना व भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा