MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

आवटी, बागवानांची पार्श्वभूमी पाहूनच पक्षात घेणार


 

या लोकांच्या बाबत काय निर्णय घ्यायचा ते अजितदादा मला विचारूनच घेतील, असा विश्वास माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. 


 


 आवटी, बागवानांची पार्श्वभूमी पाहूनच पक्षात घेणार 

: इद्रीस नायकवडी


मिरज प्रतिनिधी

 जिल्ह्यातील काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले अजितदादांना दररोज हजारो लोक भेटत असतात. मिरजेतील आवटी व बागवान परिवार त्यांच्या भेटीसाठी गेले असले तरी त्यांनी अधिकृत पक्ष प्रवेश केला की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र पक्षप्रवेश ही साधी गोष्ट नसून आम्ही त्या लोकांची पार्श्वभूमी पाहूनच योग्य तो निर्णय घेणार आहोत 




इद्रीस नायकवडी पुढे म्हणाले , सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने घेतलेले सर्वच निर्णय हे जनविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि दूरगामी विकास साधणारे आहेत. यात विशेषता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यापुढेही यात कोणताही खंड पडणार नाही, असा विश्वास माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. 

इद्रीस नायकवडी पुढे  म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे.  अजित दादा हे सर्वसामान्यांचा आणि महाराष्ट्राचा विचार करून महायुतीत सामील झाले आहेत. अल्पसंख्यांकांची प्रगती व्हावी, त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी लवकरच बार्टी, महाज्योती व सारथी या योजनांप्रमाणेच अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी अर्थात मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. याचे काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसातच याची घोषणाही केली जाईल. 




ते पुढे म्हणाले, चिन्हासाठी सुरू असलेला वाद देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाजूनेच लागेल याचा आम्हा सर्वांना विश्वास आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाईसाठी आम्ही सदैव सज्ज आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी