पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

कुख्यात गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून

इमेज
अनैतिक संबंधातून संपवले : कोयत्याने डोक्यात तब्बल २४ वार ; संशयित स्वतः पोलिसांत हजर.    सांगली जनप्रवास : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन उर्फ कमलाकर पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) याचा आज पहाटे कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याने आपल्याच घरात सच्या टारझनवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सच्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खून करणारा संशयित गणेश मोरे हा रक्ताने माखलेला कोयता घेवून स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंडाच्या खुनामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रांची मोठी गर्दी होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका ख

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

बेडग सरपंच उमेश पाटील व उपसरपंच मल्हारी नागरगोजे यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

जनप्रवास प्रतिनिधी मिरज मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  स्वागत कमान पाडल्याच्या आरोपाखाली बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश शंकर पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द अखेर मिरज ग्रामीण पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार महादेव कांबळे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.   सरपंच, उपसरपंचावरील या कारवाईनंतर बेडग गांव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तर स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट दिली. स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या दोघांना केली अटक

 २० हजारांचा मुद्देमाल केला जप्त.  जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : शहरात गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या शिराळा तालुक्यातील दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सादर लक्ष्मण जावळे (वय २५) आणि अमन महम्मद शेख (वय २३ दोघे रा. मांगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.  सांगली शहरातील आझाद चौक येथे काही दिवसांपूर्वी एका गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली कि, दोन संशयित व्यक्ती या ट्रक अड्डा येथे फिरत आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना जेरबंद केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी आझाद चौक येथील एका कारची काच फोडून त्यातील रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. यावेळी दोघांकडून चोरीतील रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमा

माजी सहायक आयुक्तांच्या मुलासह दोघांना अटक :

 बोगस बांधकाम परवाना प्रकरण ; पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचाही समावेश. जनप्रवास । प्रतिनिधी महापालिकेचा बोगस बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी माजी सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांचा मुलगा राहूल उर्फ सोमनाथ रमेश वाघमारे (वय ३०, रा. नेमिनाथनगर, विश्रामबाग) आणि  नगररचना विभागातील कंत्राटी कर्मचारी महादेव नारायण पाटील (वय ३५ रा. कापूसखेड, ता. वाळवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील पवनकुमार बापू झेंडे आणि संतोष संजय झेंडे या दोघांचा मोकळा प्लॉट आहे. या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी त्यांनी बांधकाम परवाना घेण्यासाठी एजंट राहूल वाघमारे यांच्याकडे कागदपत्रे दिली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसात महापालिकेचा बांधकाम परवाना देण्यात आला. या परवान्याबाबतची माहिती झेंडे यांच्या शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी झेंडे यांना बांधकाम परवाना कसा मिळाला याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी हा परवाना बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे रितसर तक्रार करण्यात आली. त्यावेळी महापालिकेच्या पथकाने त्याठिकाणी जावू

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची.  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार हाळवणकर आणि राहूल आवाडे हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राजवर्धन निंबाळकर यांची निवड लोकसभा मतदार संघावर जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजप काढून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. ही दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. आता येथे भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपची बरीच दमछाक होणार हे नक्की हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली य

सांगलीत भाजप सुसाट, काँग्रेसमध्ये मतभिन्नता

इमेज
आ. सुधीर गाडगीळ यांची विकास कामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल  अनिल कदम जनप्रवास  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप सुसाट असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभिन्नता असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी सांगली शहरासह ग्रामीण भागात कामांचा सपाटा लावला आहे. रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सांगली-पेठ रस्ता, कवलापूर विमानतळाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. जनसंपर्काच्या माध्यमातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे गाडगीळ विधानसभेतील मार्ग सुकर असल्याचे चित्र दिसून येते. भाजपचे सांगली मतदारसंघातील आमदार गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे आठ वर्षापुर्वी कुणालाही वाटले नव्हते. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ

इमेज
अमृत चौगुले भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे.  उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ

गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणावर छापा टाकून कारवाई

  ४ किलो गांजासह १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.  जनप्रवास । प्रतिनिधी  शहरातील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील काळ्या वाटेकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून विक्रीसाठी गांजा घेऊन निघालेल्या तरुणावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या तरुणांकडून ४ किलो ४ ग्रॅम वजनाचा गांजा एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई हि शुक्रवार दि. २१ जुलै रोजी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. नहीम मेहबूब कागजी (वय २५ रा. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शुक्रवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, संशयित कागजी हा दुचाकीवरून आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे गांजा विक्री करण्यासाठी थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकला असता संशयित कागजी हा मोटारसायकल (क्र. एमएच सीव्ही ६००८) वर संशयितरित्या थांबलेला दिसला. यावेळी त्याला सापळा रचून जेरबंद करत त्याची

उमदी पोलिसांनी गांजा तस्करीचा केला पर्दाफाश

इमेज
 ९८ किलो गांजासह १३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त : तिघांना केली अटक, दोघेजण पसार.  जनप्रवास । प्रतिनिधी उमदी : आध्र प्रदेश मधून उमदी मध्ये विक्रीसाठी आलेल्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश उमदी पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला. पोलिसांनी ९७ किलो ८५५ ग्रॅम वजनाचा वाळलेला गांजा आणि कार असा एकूण १३ लाख ६८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या इफतेखारूल हुसेन उर्फ अरबाज बाबासाहेब शेख (वय ३६ रा. कुपवाड), प्रतीक हरिदास कांबळे (वय २८ रा. नागराळे, ता. पलूस) आणि मोहसीन मेहबूब कागजी (वय २८ रा. १०० फुटी रोड, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश भाई (रा. राजमंद्री, आंध्र प्रदेश) आणि पिंटू माळी (रा. सांगली) हे दोघे पसार झाले आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी कि, उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना माहिती मिळाली कि, उमदीतील अमोघसिद्ध मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक जुनी स्विफ्ट गाडी (क्र. एमएच १३ एझेड १३७९) हि थांबली असून सदरच्या गाडीतून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे संदीप शिंदे यांनी पथकासह त्

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निशिकांत पाटील

इमेज
शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग, प्रदेशाध्यक्षांकडून निवडी जाहीर  जनप्रवास  सांगली   मागील चार महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी अखेर पार पडल्या. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची तर शहर जिल्हाध्यक्षपदी कुपवाडचे नगरसवेक प्रकाश ढंग यांची निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडी जाहीर केल्या.  भाजप जिल्ह्यात भाकरी फिरवणार असून संघटनात्मक बदल करणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवड होणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले होते. मात्र निवडींबाबत एकमत होत नसल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अखेर बुधवारी त्याला मुर्हूत मिळाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्षाच्या ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदावर नवीन निवडी जाहीर केल्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निशिकांतदादा पाटील यांच्यासह संग्रामसिंह देशमुख यांचे नाव चर्चेत होते. पाटील यांची अपेक्षेप्रमाणे

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल. सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा

मिरज पॅटर्न सक्रीय

इमेज
 उदय रावळ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आता आपल्या प्रभागातील विकास कामांना गती देत आहेत. गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा समोर ठेवण्यासाठी जनतेसमोर जावं लागणार आहे. त्यामुळे कामे लवकर संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु आत्तापासूनच गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. म्हणजेच मिरज पॅटर्न सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. महापालिका नगरसेवकांची मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे. तसतसे नगरसेवक आता अनेकांच्या चौकटीसमोर उभे दिसत आहे. भाऊ, काका, दादा, साहेब, मावशी, काकू, तात्या असा उपाद्या देवून गोंजरण्याचे नाटक आता सुरू झाले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय नाट्याचा प्रयोग पाहत अनेक  विद्यमान नगरसेवकांनी लॉगींग सुरू केली आहे. मिरज पॅटर्न प्रमाणे दादा, भाऊ, साहेब गट तयार होत आहे. मिरजेत झालेल्या लक्ष्मी मार्केटमधील आयलॅड उद्घाटनावेळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, कॉंग्रेसचे विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्ती राज्य अध्यक्ष समित कदम हे सर्वजण कार्यक्रमानिमित्त

जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा वेट अ‍ॅण्ड वॉच

इमेज
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर,  अनिल कदम  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जुलैमध्ये होणार असली तरी सुनावणी झाली तरी पावसाळ्यात या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबणीवर पडत आहेत. यापूर्वी आरक्षण पडलेले आरक्षण बदलणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या कारणांमुळे दिवाळीचा फराळ खाऊनच उमेदवार राजकीय आखाड्यात उतरतील, असे चित्र दिसत आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या असून, त्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. एप्रिल महिन्यात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. निवडणूक घेण्याबाबत यावेळी तरी नक्कीच काहीतरी निर्णय येईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड

राज्याच्या स्थापनेपासून जत, आटपाडीत मंत्रीपदाचाही दुष्काळ

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास   राज्याच्या राजकारणात गेल्या आठवड्यात मोठा भूकंप झाला आणि एका रात्रीतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले. मंत्रीपद मिळणे हा नशिबाचा आणि कर्तृत्वाचा भाग असला तरी सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्याला मात्र पाण्याच्या दुष्काळाबरोबर मंत्रीपदाचा दुष्काळही जाणवत आहे. कारण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून गेल्या 64 वर्षामध्ये अजून जत आणि आटपाडी तालुक्याला मंत्रीपदच मिळाले नाही. मंत्रीपदाचा हा दुष्काळ अनिल बाबर किंवा गोपिचंद पडळकर यांच्या रूपाने संपतो की काय हे येणार्‍या मंत्रीमंडळाच्या विस्तारातच समजेल. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1961 रोजी रोजी.  यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळाला. त्या अगोदर सांगली जिल्ह्याचा मुंबई प्रांतात समावेश होता. मुंबई प्रांताची निवडणूक मात्र 1952 पासून होत होती. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत विटा, खानापूर, आटपाडी मध्ये दोन जागा होत्या. या दोन्ही जागेवर लक्ष्मण भिंगारदेवे आणि दत्ताजीराव देशमुख निवडून आले. त्याचवेळी जतमधून विजयसिंहराजे डफळे अपक्ष म्हणून निवडून आले.  त्यानंतर पाच वर्षानी

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

अभिमानास्पद... चांद्रयान मोहिमेत सांगलीकरांचा वाटा : यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग बनवले सांगलीतील कारखान्यात.

इमेज
देशाला अभिमान वाटावा अशा ‘चंद्रयान अभियानात सांगलीच्या उद्योजकानेही हातभार लावला. यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग सांगली औद्योगिक वसाहतीतील संदीप सोले यांनी केले आहे.. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम सोले यांच्या कंपनीमध्ये होत आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चांद्रयान-३ चे यशस्व प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग माधवनगरमध्ये असलेल्या सोले यांच्या डॅझल डायनाकोटस कंपनीमध्ये हे कोटिंग करण्यात आले. आतापर्यच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम यांच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले होते. संदीप सोले व त्यांचे सुपुत्र निहार सोले यांनी कामगिरी पार पाडली. ‘चंद्रयान मोहिमेचे सुटे भाग तीन वर्षांपूर्वी कोटिंगसाठी त्यांच्याकडे आले होते. इस्त्रोने काढलेल्या टेंडरद्वारे त्यांना हे काम मिळाले. सांगलीकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली. यान अवकाशात सोडले जा

मुंबईचा फौजदार काळाच्या पडद्याआड

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे ब्रिटीशांनाही लाजविणार्‍या, आपल्या रूबाबदार व्यक्तिमत्वाने मराठी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी राज्य करणारा रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड गेला. जिवनात मरण अटळ असले तरी रविंद्र महाजनीला जसे मरण आले तसे वैर्‍याच्या वाट्यालाही येउ नये. मुंबईचा फौजदार बेवारस अवस्थेत गेला, असेच म्हणावे लागले. रमेश देव, राजा गोसावी, राजा परांजपे यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी तग धरत होती. सर्वच मराठी चित्रपटांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. सत्तरच्या दशकात रवींद्र महाजनी यांनी अखंड महाराष्ट्र हलवून सोडले होते. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम है हे त्याचे गाजलेले चित्रपट. त्यावेळी आत्ताच्यासारखे मल्टीप्लेक्स नव्हते, मोबाईल क्रांती नव्हती. तरीही गावोगावच्या जत्रेत आणि यात्रेत तंबूमध्ये मराठी चित्रपट दाखविले जात होते. अशा याकाळात एका सर्वसामान्य कुटुंबातून येउन मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारा रविंद्र महाजनी तरूण आणि तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याचे सर्वच चित्रपट हिट झाले. परंतु मुंबईचा फौजदार आणि देवता हे तर सुपरहिट ठरले. नोकरी न लागलेला तरूण हातात कुर्‍हाड घेउन वाममार्

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात, मानेंची एंट्री

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.  जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती कर

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी तर राजारामबापुंचा पराभव

इमेज
स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली 25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेली मुंबई प्रांताची ही दुसरी निवडणूक. प्रांतात 53 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात जतमध्ये विजयसिंह डफळे हे सर्वाधिक 15605 मतांनी तर शिराळा मतदार संघातून यशवंत चंद्रू पाटील हे केवळ 796 एवढ्या कमी मतांनी जिंकले. येथे राजारामबापू पाटील यांचा पराभव झाला. या 1952 च्या पहिल्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांतात लोकशाहीची पाळेमुळे रुजू लागली होती. अनेकांना निवडणुकीविषयी कुतूहल निर्माण होत होते. दुसरी पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी 1957 रोजी घेण्यात आली. यावेळी मुंबई प्रांतातील जागा वाढविण्यात आल्या. पहिल्या निवडणुकीत 268 असणार्‍या जागा एकदम 339 झाल्या. यामध्ये खुल्या वर्गासाठी 266 तर एस. सी. साठी 42 तर अनुसूचित जातीसाठी 31 जागा राखीव ठेवण्यात आल्या. आपल्या भागातील विटा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. या मतदारसंघातून एक राखीव आणि एक खुला असे दोन आमदार निवडून यायचे होते. या निवडणुकीत भगवान नानासाहेब मोरे व म्हडाले पिराजीराव ताव्याप्पा हे दोघे आमदार म्हणून निवडून आले.

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

इमेज
 वसंतदादां,  कळंत्रे आक्का, गुंडू दशरथ पाटील, दत्ताजीराव सूर्यवंशी, एस. डी. पाटील,  सरोजिनी बाबर निवडून आल्या. दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. नव्या युगाची नवी सुरुवात झाली. अजून देशात लोकशाही स्थिरस्थावर झाली नव्हती आणि प्रांत रचनाही झाली नव्हती, परंतु इंग्रजांनी करून ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रांताने भूभाग ओळखला जायचा. मुंबई प्रांतही त्यातीलच एक भाग. या मुंबई प्रांतात सध्याच्या गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र हा भाग असल्याने येथील  अहमदाबाद, बडोदा, सूरत हेही भाग होते. तसेच सध्याच्या कर्नाटकातील चिक्कोडी, रायबाग, गोकाक, बेळगाव, हुक्केरी, तिकोटा, मुद्देबिहाळ, जमखंडी, मुधोळ, बागलकोट, धारवाड, हुबळी, गदग, हावेरी हे भाग मुंबई प्रांतातच होते. 26 मार्च 1952 रोजी मुंबई प्रांतांची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. एकूण 268 जागांसाठी ही निवडणूक झाली, त्यामध्ये 260 खुल्या, तर 8 जागा राखीव होत्या. पहिल्याच निवडणुकीत 50.78 टक्के मतदान झाले. या पहिल्याच निवडणुकीत ऑल इंडिया भारतीय जनसंघ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, एफ.बी.अखिल भारतीय हिंदू महासभा काँग्रेस कृपीकर लोक पार्टी,

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी