MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही, अतिरेकानंतर स्फोट होईल, बच्चू कडूंची खदखद



सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची अडचण झाली आहे, अतिरेकानंतर स्फोट होईल, अशी खदखद माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 

अजित पवार यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवार यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले आहे. अजित पवार यांनी 40 आमदारांना हाताशी धरत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता माजी आमदार बच्चू कडू यांनी याबाबत
स्पष्टच व्यक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतले नाही, अशी खदखद बच्चू कडू यांनी बोलून दाखवली.

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेताना त्यांचं मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. आम्हाला विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार्‍या सर्व आमदारांची अडचण झाली आहे.  कारण मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुर्‍हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये, याची आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडावर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यामुळे या बंडाचं दुःख मोठ आहे. शरद पवार साहेबांना झालेल्या वेदना कमी नाहीत. त्यांचं सांत्वन आम्ही करतो. या उठावाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिंदे आणि आता अजित पवार यांनी केली आहे. सगळ्या उठावाचे भिष्मपिता शरद पवार आहेत. बंड शरद पवारसाठी नवीन नाही. बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी उचलेल पाऊल अभिनंदनास पात्र आहे, असे  बच्चू कडू म्हणाले.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी