MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सुप्रिया सुळे अ‍ॅक्शन मोडमध्ये,


प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द होणार?

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. त्यामुळे खासदार
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी आगामी काळात खरंच रद्द होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेना सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या इतर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्यासह जे नेते सरकारमध्ये सामील झाले आहेत ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्याच्याशी पक्षाचा काहीच संबंध नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवार स्वत: आता राजकीय मैदानात उतरले आहेत. ते आता पक्षाला वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार, खासदार परत येतील, असा दावा शरद पवार यांनी केलाय. तसेच त्यांनी केलेला दावा काही अंशी खरंदेखील ठरताना दिसतोय. काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती आमदार राहतील, याबाबतचं चित्र पुढच्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे, पण ते बंड पुन्हा फसणार नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतंय.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी